मग काय सकाळी-सकाळी म्हटलं मस्त पाऊस चालू आहे, तर पावसामध्ये चहा भजे बनवूया,पावसामध्ये चहा आणि भजे खाण्याची मजा काही वेगळीच असते.आणि पावसाळा या ऋतू मध्ये लहान मुले आणि मोठे देखील खूप आनंदित होतात. मुलांना पावसामध्ये भिजायला आणि खेळायला आणि फिरायला खूप आवडतं.
खूप जण पावसाळ्यात घराच्या बाहेर अंगणात बसून पाऊस बघण्याचा आनंद घेत असतात.पावसामध्ये खूप जणांना गरम चहा किंवा कॉफी प्यायला फार आवडते. "तुम्हाला आवडते का पावसामध्ये चहा भजी खायला...? मुलांना उन्हाळ्याच्या शाळेला सुट्ट्याच होत्या. मग काय मुले लवकर उठतच नव्हते. मग काय सर्वांनी चहा आणि भज्यांचा अस्वाद घेतला. थोड्यावेळाने पाऊस थोडा कमी झाला होता. मग मी काही कामासाठी बाहेर गेले तर बघते, तर काय मुसळधार पावसाने खूप जणांचे नुकसान केले होते. काही लोकांच्या घरात देखील पाणी शिरले होते. काहींचे तर पत्र उडून गेले होते. झाडांच्या फांद्या रोडवर तुटून पडल्या होत्या.
बातम्यांमध्ये दाखवले की सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. गावाकडे तर नद्यांना पूर आले आहेत. ते सारं पाहून खूप वाईट वाटत होते. मनात विचार आला की, पाऊस तर निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. तो पृथ्वीवरील जीवनचक्रासाठी खुप आवश्यक आहे. पाऊस नसेल तर शेतकरी, प्राणी, पक्षी आणि मानवाचे जीवन धोक्यात येईल. पाऊसामुळे नद्या, तलाव आणि जलाशय भरतात, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते. पाऊस मुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढवते, आणि
त्या मुळे शेतकरी आपले धान्य चांगले उगवू शकतो. पावसामुळे निसर्गाचे एक चांगले वातावरण तयार होते.पावसाळ्यात वातावरण खूपच शांत आणि सुंदर होते. ढग आकाशात फिरताना दिसतात. ढगांच्या काळ्या रंगाने आकाश अधिक सुंदर दिसते. पावसाच्या थेंबांनी पृथ्वीला भिजवून हिरवळ अधिक सुंदर दिसते. पावसामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि फुले फुलताना दिसतात, त्यामुळे निसर्गाला एक नवीन रूप प्राप्त होते.
आपल्याला पाऊस तर हवा हवा असा वाटतो. पण पावसामुळे खूप सार्या लोकांचे खूप नुकसान पण होते. शेतकरी मात्र पाऊस आला तर त्याची खुशी गगनात मावत नाही पण अवकाळी पाऊस झाला, तर शेतकऱ्याचे फार नुकसान करून जातो.
त्यामुळे पावसाळ्यामध्ये भाजीपाला देखील चांगला मिळत नाही, पावसामुळे आपले किती जरी नुकसान झाले तरी, पाऊस हे एक निसर्गाचे सुंदर रूप आहे. पाऊस हे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. पाऊस या ऋतूमध्ये निसर्गाचे सौंदर्य आणि आनंद अनुभवणे खूप खास असते.
त्यामुळे पावसाळा एक महत्त्वपूर्ण ऋतू आहे,
जो आपल्याला जीवन आणि निसर्गाचे महत्त्व शिकवत असतो.
पाऊस आला पाऊस आला....,
आनंदा ने नाचू चला......!
मातीचा सुगंध आला,
झाडे झाली हिरवीगार.......!
शेतमळे झाली हिरवीगार,
पाऊस आला पाऊस आला.....!
आनंदाने नाचू चला पावसामध्ये भिजू या,
सुंदर गाणी गाऊ या......!
पाण्यामध्ये जहाज टाकून खेळू चला,
पाऊस आला पाऊस आला......!
शेतकरी झाला आनंदी,
काय सांगू मी पाऊस किती......!
पाऊस आला पाऊस आला,
आनंदाने नाचू चला........!
या जगात सर्व जीवसृष्टी साठी पावसाळा आणि पाणी खूप महत्त्वा चे आहे. पावसामुळे पाणी मिळते. जे सर्व सजीवांसाठी महत्त्वाचे आहे. पाउस आला कि सर्व वातावरण खुप थंड होऊन जात आणि शेतकरी ही पाऊसाची अतुरतेने वाट पाहत असतात.
पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध ही फार निराळाच असतो, पावसामध्ये आम्ही आमच्या बालपणीच्या आठवणी जगत असतो.
मातीचा हा सुगंध मान्सूनच्या आगमनाची घोषणा करण्याचा निसर्गाचा मार्ग आहे. आणि तो ऋतूंच्या चक्रीय सौंदर्याची आठवण करून देतो.
"आजचा ब्लॉग मी आता सध्याची पावसाची परिस्थिती नुसार लिहिला आहे.तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद...........!
0 Comments